पंचाईत
आताशा म्हणे बर्याच मनोगतींची पंचाईत झाली आहे. त्यांना कोणी वालीच उरलेला नाही. त्यांची प्रतिभा गायब होण्याच्या मार्गावर आहे म्हणून प्रत्येकाने आपापला ब्लॉग टाकला आहे.
आम्हाला एक कळत नाही. “वाहवा! भले शाब्बास!” अश्या प्रतिसादांसाठी लेखन करण्याची सवय झालेल्या निदान काहीजणांनातरी (कृपया, या काहीजणांची संख्या विचारू नये.
) हे ब्लॉगविश्व कसे बरे रुचणार?
असो. आम्हाला कशाला नसती पंचाईत?